आशिष नेहाराची निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली, दि. 12, ऑक्टोबर - टीम इंडियाचा सर्वात अनुभवी गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. होमग्राऊंड असलेल्या फिरोज शाह कोटला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी होणार्या टी-20 सामन्यानंतर तो निवृत्ती जाहीर करणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना या निर्णयाबाबत आशिष नेहराने माहिती दिली आहे. आयसीसी 2018 मध्ये टी- 20 विश्वचषकाचं आयोजन करणार नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करत असलेल्या युवा खेळाडूंना संधी देणं जास्त योग्य राहिल, असं नेहराने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. यातील टी-20 सामना 1 नोव्हेंबरला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणार आहे. हेच मैदान नेहराचं होमग्राऊंडही आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना या निर्णयाबाबत आशिष नेहराने माहिती दिली आहे. आयसीसी 2018 मध्ये टी- 20 विश्वचषकाचं आयोजन करणार नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करत असलेल्या युवा खेळाडूंना संधी देणं जास्त योग्य राहिल, असं नेहराने म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. यातील टी-20 सामना 1 नोव्हेंबरला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणार आहे. हेच मैदान नेहराचं होमग्राऊंडही आहे.