उस्मानाबाद, लातूर जिल्हयातील काही गावांत भूकंपाचे सौम्य धक्के
उस्मानाबाद, दि. 01, नोव्हेंबर - लातुर जिल्हयातील औसा तालुक्यात आणि उस्मानाबाद जिल्हयातील काही गावांत आज दुपारी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. यात कोणतेही नुकसान झालेले नाही. किल्लारी, बेलकुंड भागातील काही गावांत लोकांना आवाज आला. दुपारी 12.23 वाजता हे जाणवले. अडीच रिश्टर स्केल एवढीच या भूकंपाची तीव्रता होती. मात्र पूर्वी असे सौम्य धक्के बसत बसतच एकदम मोठा भूकंप 1993 ला झाला होता. त्याची आठवण परत या भूकंपामुळे या भागात जागी झाली.