Breaking News

40 तासांनंतरही जवाहर द्विपावरील सुरूच

मुंबई, दि. 08, ऑक्टोबर - जवळपास 40 तास उलटून गेल्यानंतरही मुंबईजवळच्या बुचर म्हणजेच जवाहर द्विपावरील तेलाच्या टाकीला लागलेली आग अजूनही  सुरुच आहे. आग लागलेल्या टाकीत अजून सत्तर हजार लिटर डिझेल शिल्लक आहे. त्यामुळे आग आटोक्यात येण्यासाठी अजून दहा ते बारा तास लागू शकतात.
आगीमुळे जवळपास 235 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास बीपीसीएल कंपनीच्या मालकीच्या तेलाच्या टाकीला  आग लागली. तेव्हापासून भरसमुद्रात हे अग्नीतांडव सुरूच आहे.
ज्या टाकीला आग लागली, त्यात 32 हजार मेट्रिक टन हायस्पीड डिझेल आहेत. जवाहर द्वीप हे घारापुरी लेण्यांजवळ असून ते मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचं आहे.  तेलाचा साठा करण्यासाठी हे द्वीप विविध कंपन्यांना भाडेतत्वावर देण्यात आलं आहे.