Breaking News

विहीरीत बुडून मरण पावलेल्या मुलींच्या पित्याने केली आत्महत्त्या

जालना, दि. 26, सप्टेंबर - काल विहिरत पडून मरण पावलेल्या दोन मुलींच्या दुखी पित्याने आज त्याच विहरीत उडी मारून आपले जीवन संपवले. ही र्हदयद्रावक  घटना मंठा तालुक्यातील काळवाई या गावी घडली.
केशव रामभाऊ गायकवाड (वय 35) हे काल त्यांच्या शेतात काम करत होते तर त्यांच्या दोन गोंडस मुली मिनाक्षी (वय 6) व साक्षी (वय 9) या रविारची सुटी  असल्याने बाबांबरोबर शेतात जावुन खेळत होत्या दुपारी त्यांना शेतातील झाडावर माकडं दिसली ती शेतात नासधुस करतील म्हणून केशव गायकवाड यांनी त्या  माकडांना झाडावरू हाकलल्यानंतर माकड शेतात पळू लागली. माकडे आपल्या दिशेने येत असलेले पाहून या मुली पळू लागल्या आणि अनावधानाने शेतातील  विहिरीत पडल्या .क्षणात पाण्यात बुडाल्याने दोघींचा मृत्यू झाला.मुलींच्या मृत्यूमुळे सैरभर आणि व्यथित झालेले केशव गायकवाड कालपासून बेचैन होते रात्री ते  घरातून कोणालाहि न सांगता निघून गेले.आज सकाळी नातेवाईकांनी शेतात पाहिले असता त्याच विहिरी बाहेर त्यांची चप्पल आणि विहरीत त्यांचा मृतदेह दिसला.  त्यांच्या मागे पत्नी व छोटा मुलगा आहे.