Breaking News

काश्मिर इतकाच नक्षलवादाचा प्रश्‍न गंभीर - उदय जगताप

पुणे, दि. 15, सप्टेंबर - गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात काम केल्यानंतर समजले की काश्मिर इतकाच नक्षलवादाचा प्रश्‍न गंभीर आहे, तो संपविण्यासाठी  प्रयत्न केले पाहिजे. नक्षलवाद आणि गुन्हेगारी सारखे प्रश्‍न सोडवायचे असतील तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रथम प्रयत्न केले पाहिजेत, असे  प्रतिपादन नक्षलग्रस्त भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांनी केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कै. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्मरणार्थ ग्राहकतीर्थ  व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नक्षलवाद आणि उपाय याविषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेचे उद्घाटन अ‍ॅड. प्रताप परदेशी यांच्या  हस्ते झाले. यावेळी भाऊ आदमणे, शिल्पकार विवेक खटावकर, सुभाष सरपाले, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, मॉडर्न कॉलजचे उपप्राचार्य मिलींद वाघमारे,  प्रा. संगीता मावळे उपस्थित होते.