Breaking News

वानरांना घाबरून पळताना विहिरीत पडून दोघींचा मृत्यू

जालना, दि. 25, सप्टेंबर - मंठा तालुक्यातील वाई येथे वानरांना घाबरून पळणार्‍या दोन लहान बालिका विहिरीत पडल्याने बुडून मरण पावल्या. मंठा तालुकयात  वाई येथे आज सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास या मुलींच्या वडिलांनी झाडावरून वानरांना हाकलले. मात्र आपण हाकलत असलेली वानरे आपल्या आयुष्यात  भयंकर घटनेचे कारण होतील याची पुसटशीही कल्पना गायकवाड यांना आली नाही. त्यांनी हाकललेली वानरे आपल्याच दिशेने येत आहेत ती आपल्यावर हल्ला  करतील अशा भीतीने गायकवाड यांच्या दोन लहान मुली साक्षी वय 9 व मिनाक्षी वय 6 वर्षे या पळू लागल्या पळता पळता त्या विहिरीत पडल्या व त्यांचा मृत्यू  झाला.