राणे यांनी समर्थ पॅनल नावाने पक्ष स्थापन करून निवडणूक लढवाव्यात - दीपक केसरकर
सावंतवाडी, दि. 25, सप्टेंबर - समर्थ विकास पॅनलच्या नावाखाली निवडणूक लढवणा-या नारायण राणे यांनी याच नावाने पक्ष स्थापन करून निवडणूक लढवाव्यात. म्हणजे कोणाची ताकद किती आहे हे कळेल, असे आव्हान गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत राणे यांना दिले.
केवळ पैसा व ज्या पक्षात जाणार त्याच्या पाठिंब्यावर आमदार फोडणे सोपे असते. मात्र स्वत:च्या ताकदीवर किती आमदार निवडून आणता येतील हे त्यांनी सांगावे, असेही केसरकर म्हणाले. गोळवलकर गुरूजी, डॉ. हेडगेवार या महान व्यक्तींच्या विचारांवर भाजपची वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे पक्षाला कशी चालतील, असा प्रश्नही केसरकर यांनी विचारला.
केवळ पैसा व ज्या पक्षात जाणार त्याच्या पाठिंब्यावर आमदार फोडणे सोपे असते. मात्र स्वत:च्या ताकदीवर किती आमदार निवडून आणता येतील हे त्यांनी सांगावे, असेही केसरकर म्हणाले. गोळवलकर गुरूजी, डॉ. हेडगेवार या महान व्यक्तींच्या विचारांवर भाजपची वाटचाल सुरू आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे पक्षाला कशी चालतील, असा प्रश्नही केसरकर यांनी विचारला.