Breaking News

‘धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच धरणांची निर्मिती’

अकोले, दि. 09 - धरणग्रस्तांच्या त्यागामुळे भंडारदरा धरण झाले असून धरणाच्या पाण्यावर पहिला अधिकार, हक्क आपला आहे भंडारदरा धरण हि  वहिवाट आहे  आपली वहिवाट आपण सोडायची नाही कारण वहिवाट सोडली तर कोणीपन घुसतो व आपल्या हक्कावर गदा आनु पाहतो. असे भंडारदरा धरण जलपुजन कार्यक्रम  प्रसंगी बोलताना माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड म्हणाले.
उत्तर अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याने अकोले माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, तालुक्याचे विद्यमान  आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते  साड़ीचोळी अर्पण करून विधीवत जलपुजन करण्यात आले. जलपुजन कार्यक्रमानंतर आश्रम शाळा शेंडी येथे संवाद सभेचे  आयोजन करण्यात आले होत.
पिचड पुढे म्हणाले की भाजप सरकार हे कुठलेही ध्येय धोरण नसलेले सरकार आहे. आम्ही राईट टु एज्युकेशन सारख्या योजना राबविल्या व  शिक्षणापासून कोणी  वंचीत राहु नये म्हणुन वस्तीशाळांची निर्मिती केली मात्र भजप सरकारने तालुक्यातील 124 शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन आदिवासींचे मुले शिक्षणापासून वंचित  ठेवण्याचा कारभार सुरु केलाय. धरणातील पाणी सोडण्याच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील आमदारांची असलेली कमिटी रद्द करून डॉडसन सारख्या सदस्य असणार्‍या   कमिटी स्थापन केली.शेतकर्याचे हक्क काढुन डॉडसन ला बाप केला अंब्रेलाफॉल रंधा धबधबा बंद करून पर्यटनावर गदा आनुन आदिवासी तरुणांना रोजगार कसा  मिळणार तरूणांना तंबु लावु द्या रोजगार मिळु द्या त्यांना कोणी रोखलं तर त्याला धरणात बुडवु असा सज्जड दम देखील यावेळी दिला.
आमदार वैभव पिचड म्हणाले की एकीकडे धरण भरण्याच्या आनंद होतो मात्र हे धरण भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील आदिवासी बांधवांना 300 मीमी पाऊस अंगावर  घ्यावा लागतो दोन महिने प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात याचे दुख वाटते. आज रक्षाबंधन व जलपुजन  योगायोग जुळुन आले आहेत.
साड़ीचोळी अर्पण करून समृद्धी भरभराटीसाठी प्रवरा मातेला प्रार्थना करतो. व आदिवासीचे हक्क कोनी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये असे आरक्षण सबंधी म्हणाले.
जलपुजन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरीजाजी जाधव, अर्थ बांधकाम सभापती कैलास वाकचौरे, जे. डी. आंबरे, मंगलदास भवारी, मिनानाथ  पांडे, वनक्षेत्रपाल पडवळे, गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, अरुण माळवे,  धरण शाखाधिकारी  राजेंद्र कांबळे, लकी जाधव, भरत घाणे, जयराम इदे, सुनील  सारोक्ते, संपत झड़े,  पांडुरंग खाडे, धोंडिबा सोगाळ, पाड़ू सोंगाळ, संतु बांडे, दिलीप रगडे, भरत घोरपडे, भगवान झडे, माधव गभाले, विठ्ठल पटेकर यांचेसह ग्रामस्थ  उपस्थित होते.