कल्याण-डोंबिवलीत रिक्षामध्ये चालकाची माहिती बंधनकारक
कल्याण, दि. 30 - कल्याण आणि डोंबिवलीतील रिक्षाचालकांना यापुढे रिक्षामध्ये आपली माहिती लावणं बंधनकारक करण्यात आलंय. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक विभागानं हा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाच्या या निर्णयानंतर महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे.
ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांत सलग घडलेल्या या घटना पोलिसांनी चांगल्याच गांभीर्यानं घेतल्या आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास वाहतूक विभागानं सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत घडलेले हे गुन्हे पाहता यात रिक्षाचालकांचा प्रमुख सहभाग असल्याचं आढळलं आहे. या प्रत्येक घटनेनंतर रिक्षाचालकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची मोठी शिकस्त करावी लागली.
त्यामुळं यापुढे कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षात स्वतःची माहिती लॅमिनेशन करुन लावण्याचे आदेश वाहतूक विभागानं दिले आहेत. यासाठी वाहतूक विभागानं कल्याण-डोंबिवलीतील 15 हजार रिक्षाचालकांना नमुने वाटले आहेत. त्यांच्याकडून या अर्जाची एक प्रत वाहतूक विभागाला द्यावी लागणार आहे, तर वाहतूक विभागाचा शिक्का मारलेली दुसरी प्रत रिक्षेत लावावी लागणार आहे.
ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत मागील काही दिवसांत सलग घडलेल्या या घटना पोलिसांनी चांगल्याच गांभीर्यानं घेतल्या आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास वाहतूक विभागानं सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत घडलेले हे गुन्हे पाहता यात रिक्षाचालकांचा प्रमुख सहभाग असल्याचं आढळलं आहे. या प्रत्येक घटनेनंतर रिक्षाचालकाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची मोठी शिकस्त करावी लागली.
त्यामुळं यापुढे कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षात स्वतःची माहिती लॅमिनेशन करुन लावण्याचे आदेश वाहतूक विभागानं दिले आहेत. यासाठी वाहतूक विभागानं कल्याण-डोंबिवलीतील 15 हजार रिक्षाचालकांना नमुने वाटले आहेत. त्यांच्याकडून या अर्जाची एक प्रत वाहतूक विभागाला द्यावी लागणार आहे, तर वाहतूक विभागाचा शिक्का मारलेली दुसरी प्रत रिक्षेत लावावी लागणार आहे.