सात एकरमध्ये साकारलेल्या रांगोळीस लिम्का बुक्सचे प्रमाणपत्र
जळगाव, दि. 24 - ’जल है तो कल है’ हा जलबचतीचा संदेश देण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स, नीर फाउंडेशन व शासनाचा जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ सात एकर क्षेत्रात मनोवेधक महाकाय रांगोळी 10 एप्रिल 2016 ला साकारली. सुमारे 750 स्वयंसेवकांनी एकूण 28, 224 चौरस मीटरमध्ये 8 विविध रंगांत, 63 टन इकोफ्रेंडली रांगोळीचा वापर करून ही भलीमोठी रांगोळी साकारली होती. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र नीर फाउंडेशन आणि जैन इरिगेशनला नुकतेच प्राप्त झाले.
ही रांगोळी साकारण्यासाठी साधारणत: दोन तासांच्या कालावधीचा अंदाज होता. मात्र, शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सेवाभावी संस्थांच्या मदतीने अवघ्या 40 मिनिटांत ही रांगोळी साकारली. या उपक्रमात गोदावरी महाविद्यालय, आयएनएफडी महाविद्यालय, मू. जे. महाविद्यालय, वर्षा पाटील फॅशन डिझायनिंग महाविद्यालय, बांभोरी अभियांत्रिकी, रायसोनी महाविद्यालय, गुलाबराव देवकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विविध संस्था, संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. जैन इरिगेशनचे संस्थापक मोठे भाऊंनी पाणी, शेती आणि शेतकरी हे जिव्हाळ्याच्या विषयांवर आयुष्यभर कार्य केले. याच जाणीवेतून, बांधिलकीतून जैन इरिगेशनने उच्च कृषी तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जलबचतीचा मंत्र दिला. हाच वसा आणि वारसा घेऊन जैन इरिगेशन जनसामान्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देत आहे.
ही रांगोळी साकारण्यासाठी साधारणत: दोन तासांच्या कालावधीचा अंदाज होता. मात्र, शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सेवाभावी संस्थांच्या मदतीने अवघ्या 40 मिनिटांत ही रांगोळी साकारली. या उपक्रमात गोदावरी महाविद्यालय, आयएनएफडी महाविद्यालय, मू. जे. महाविद्यालय, वर्षा पाटील फॅशन डिझायनिंग महाविद्यालय, बांभोरी अभियांत्रिकी, रायसोनी महाविद्यालय, गुलाबराव देवकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विविध संस्था, संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. जैन इरिगेशनचे संस्थापक मोठे भाऊंनी पाणी, शेती आणि शेतकरी हे जिव्हाळ्याच्या विषयांवर आयुष्यभर कार्य केले. याच जाणीवेतून, बांधिलकीतून जैन इरिगेशनने उच्च कृषी तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जलबचतीचा मंत्र दिला. हाच वसा आणि वारसा घेऊन जैन इरिगेशन जनसामान्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देत आहे.