केडगावातील महिलांनी काढला मनपा उपकार्यालयावर हंडामोर्चा
अहमदनगर, दि. 24 - अथर्व नगर, ठुबे मळा, विठ्ठल नगर, देवी रोड, केडगांव येथील रहिवासी यांनी महानगरपालिकेच्या उपनगर कार्यालय येथे पाणी आणि इतर विविध प्रश्नांसाठी हंडा मोर्चा काढला होता. यामध्ये कषविता बिचकर, मंजुषा पाठक, मीरा घोडके, वर्षा बडवे, सोनाली कुलकर्णी, कल्याणी सुर्यवंशी, सुनिता दुधवणे, वंदना भोसले, सुनिता वाघमारे, सुलोचना गारुडकर, श्रेया जोशी, साधना घुले, पदमा तांबे, सारिका सूर्यवंशी, रेखा पावसे, संगीता आंधळे, सरोजिनी खेवट आदि सहभागी झाल्या होत्या.
यावेळी दिलेल्या निवेदात म्हंटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपसून पाण्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न प्रलंबीत आहे. परंतु याकडे लक्ष देणण्यासाठभ कोणालाही वेळ नसल्याची परस्थिती आहे. वेळावेळी निवेदने देवुनही पाणीप्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ळाला मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर मनपा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर वेगळे आंदोलन उभारण्यात येईल. केडगावातील रहिवाशांच्या तक्रारी ऐकुन त्यावर लवकरात लवकर विचार करावा. केडगावमधील अनेक भागात नियमीत पाणीपुरवठा होत नाही. तसेच वेळावेळी कमी दाबाने पाणी येत असल्याने काही ठिकाणी पाईप फुटल्यामुळे पाणी अस्वच्छ येत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे, तरी मनपाने तातडीने केडगावकरांचा पाणीप्रश्न मार्गी लावावा असे निवेदनात म्हंटले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदात म्हंटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपसून पाण्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न प्रलंबीत आहे. परंतु याकडे लक्ष देणण्यासाठभ कोणालाही वेळ नसल्याची परस्थिती आहे. वेळावेळी निवेदने देवुनही पाणीप्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ळाला मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर मनपा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर वेगळे आंदोलन उभारण्यात येईल. केडगावातील रहिवाशांच्या तक्रारी ऐकुन त्यावर लवकरात लवकर विचार करावा. केडगावमधील अनेक भागात नियमीत पाणीपुरवठा होत नाही. तसेच वेळावेळी कमी दाबाने पाणी येत असल्याने काही ठिकाणी पाईप फुटल्यामुळे पाणी अस्वच्छ येत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे, तरी मनपाने तातडीने केडगावकरांचा पाणीप्रश्न मार्गी लावावा असे निवेदनात म्हंटले आहे.