स्व. विलासराव देशमुख हे कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत- आ. थोरात
संगमनेर, दि. 27 - स्व. विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून राज्यात नव्हे तर देशात वेगळा ठसा उमटविला. विकासात्मक कामातून तळागाळातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. कायम हसतमुख व बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या स्व. विलासराव देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्यांसाठी सदैव मोठे प्रेरणास्त्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
काँग्रेस कमिटीच्यावतीने यशोधन या संपर्क कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, अजय फटांगरे, विश्वास मुर्तडक, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, सौ. अर्चना बालोडे, केशव मुर्तडक, मिलींद औटी, बुवाजी पुणेकर, ज्ञानेश्वर राक्षे, अॅड.सुहास आहेर, तात्याराम कुटे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले, राजकारणात स्व. विलासराव देशमुख यांच्याबरोबर काम करण्याची अनेक वर्ष संधी मिळाली. त्यांनी कायम आपल्यावर विश्वास टाकला. राज्यात विविध विकास योजना राबवितांना सर्व सामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयाला प्राधान्य देवून सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची त्यांची पध्दत विशेष लोकप्रिय होती. राजकारणाबरोबरच कला, क्रिडा, साहित्य, नाटय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतून चाहता वर्ग निर्माण केला. प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान, भाषेवर प्रभुत्व, कलागुण संपन्न व्यक्तीमत्व यामुळे स्व. विलासराव देशमुख राज्याच्या राजकारणात नेहमीच अग्रभागी राहिले. राज्याचे नेतृत्व करत असतांना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. राजकारणापलीकडे दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून स्व. विलासराव देशमुख संपूर्ण राज्याला परिचीत होते. सतत कार्यमग्न राहून आलेल्या प्रसंगाना आपल्या खास शैलीतून सामोरे जाण्याची त्यांची पध्दत वैशीष्टे पूर्ण होती. नगर जिल्ह्याबरोबरच संगमनेर तालुक्यावर कायम त्यांनी प्रेम केले. आपल्यावर लहान भावा सारखे प्रेम केले. त्यांच्या जाण्याने देशपातळीवरील समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या स्मृती राज्यातील कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, दिलखुलास व्यक्तीमत्व, अफाट स्मरणशक्ती, कामाचे अकलन करुन त्वरीत निर्णय घेण्याची पध्दत यामुळे ते लोकप्रिय नेते ठरले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेस पक्षाचा सर्वांना भावणारा असा लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख कायम स्मरणात राहणारी आहे. स्व.विलासराव देशमुख यांनी कायम आपल्या तालुक्यावर प्रेम केले आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर लहान भावासारखे प्रेम केले. लोकनेता असलेल्या स्व.विलासरावांचे जीवन कार्य नव्या पिढीला कायम मार्गदर्शक ठरणारे असल्याचे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ तर अॅड. सुहास आहेर यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीच्यावतीने यशोधन या संपर्क कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, अजय फटांगरे, विश्वास मुर्तडक, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, सौ. अर्चना बालोडे, केशव मुर्तडक, मिलींद औटी, बुवाजी पुणेकर, ज्ञानेश्वर राक्षे, अॅड.सुहास आहेर, तात्याराम कुटे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले, राजकारणात स्व. विलासराव देशमुख यांच्याबरोबर काम करण्याची अनेक वर्ष संधी मिळाली. त्यांनी कायम आपल्यावर विश्वास टाकला. राज्यात विविध विकास योजना राबवितांना सर्व सामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयाला प्राधान्य देवून सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची त्यांची पध्दत विशेष लोकप्रिय होती. राजकारणाबरोबरच कला, क्रिडा, साहित्य, नाटय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतून चाहता वर्ग निर्माण केला. प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान, भाषेवर प्रभुत्व, कलागुण संपन्न व्यक्तीमत्व यामुळे स्व. विलासराव देशमुख राज्याच्या राजकारणात नेहमीच अग्रभागी राहिले. राज्याचे नेतृत्व करत असतांना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतून जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. राजकारणापलीकडे दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून स्व. विलासराव देशमुख संपूर्ण राज्याला परिचीत होते. सतत कार्यमग्न राहून आलेल्या प्रसंगाना आपल्या खास शैलीतून सामोरे जाण्याची त्यांची पध्दत वैशीष्टे पूर्ण होती. नगर जिल्ह्याबरोबरच संगमनेर तालुक्यावर कायम त्यांनी प्रेम केले. आपल्यावर लहान भावा सारखे प्रेम केले. त्यांच्या जाण्याने देशपातळीवरील समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या स्मृती राज्यातील कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, दिलखुलास व्यक्तीमत्व, अफाट स्मरणशक्ती, कामाचे अकलन करुन त्वरीत निर्णय घेण्याची पध्दत यामुळे ते लोकप्रिय नेते ठरले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. काँग्रेस पक्षाचा सर्वांना भावणारा असा लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख कायम स्मरणात राहणारी आहे. स्व.विलासराव देशमुख यांनी कायम आपल्या तालुक्यावर प्रेम केले आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर लहान भावासारखे प्रेम केले. लोकनेता असलेल्या स्व.विलासरावांचे जीवन कार्य नव्या पिढीला कायम मार्गदर्शक ठरणारे असल्याचे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ तर अॅड. सुहास आहेर यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
