Breaking News

आसूड यात्रेस भूमिपुत्र संघटनेचा पाठिंबा

। असूड यात्रेचे नगरमध्ये दि. आज आगमन

अहमदनगर, दि. 17 - शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी नागपूर ते वडनगर आसूड यात्रा काढली आहे. या यात्रेचे 17 रोजी नगर शहरात आगमन होणार आहे. तरी या यात्रेस महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात येणार आहे.या यात्रेत सक्रिय सहभाग घेण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल देठे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
कोसळलेल्या शेतमालाच्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, त्याला आधार देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी देऊन. सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची आवश्यकता आहे. परंतु सरकार शेतकर्यांच्या प्रश्‍नांवर गंभीर नसल्याने राज्यात विविध ठिकाणी शेतकरी संघटना व शेतकरी आंदोलनं करत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी नागपूर येथून आसूड यात्रेचा प्रारंभ केला आहे. व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर येथील निवासस्थानी या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. दरम्यान ही यात्रा नगर येथे 17 रोजी येणार असल्याने या यात्रेस सक्रिय पाठिंबा देऊन सहभागी शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष संतोष वाडेकर , जिल्हाध्यक्ष अनिल देठे पाटील, सचिव किरण वाबळे, उपाध्यक्ष असिफ शेख ,खजिनदार नीलेश तळेकर, जिल्हासंपर्क प्रमुख तुकाराम हासे, नगर तालुका अध्यक्ष अक्षय गवळी, पारनेर अध्यक्ष सचिन सैद, नंदू साळवे,गणोश गायकर , रोहिदास धुमाळ,सुमित गाढवे,भाऊसाहेब वाल्हेकर, संजय भोर, ज्ञानेश्‍वर गागरे, संदीप जाधव, सचिन शेळके,अनिल लांडगे, योगेश जाधव,सोमनाथ हासे,  जाफर पठाण, रवि शेळके, मोहन मोढवे आदींनी केले आहे.