राजकीय दबावाखाली करावे लागते काम; वायसीएमएचच्या निवासी डॉक्टरांची तक्रार
पुणे, दि. 24 - रुग्णांसोबत नातेवाईकांचा लोंढाच रुग्णालयात येतो. काम सुरु असताना सरळ कानाला फोन लावला जातो व आमच्या रुग्णाला आधी तपासा, अशा स्वरुपाच्या धमक्याच आम्हाला फोनवरुन दिल्या जातात, रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नाही की सुरक्षा रक्षक नाहीत, असे गंभीर आरोप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या (वायसीएमएच) डॉक्टरांनी (गुरुवारी) केले.
धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रभर डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्याचाच एक भाग वायसीएम रुग्णालयाच्या सर्व डॉक्टरांची आज सकाळी एक बैठक झाली. त्या बैठकीत डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून आज पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील 38 निवासी डॉक्टर व रुबी अल केअरचे दोन अशा 40 डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे.
यावेळी आपल्या मागण्या माडतांना उपस्थित डॉक्टरांनी आम्हाला मानधनही कमी मिळते, रुग्णालयात स्टाफ कमी आहे, तसेच रात्रीच्यावेळी किंवा एरवीही रुग्णाबरोबर 8 ते 10 नातेवाईक येतात. ते सुरक्षा रक्षकाला जुमानत नाहीत. डॉक्टरांना उद्धटपणे बोलणे, धक्काबुक्की करणे किंवा सरळ कानाला फोन लावून हाततले काम सोडून आधी रुग्णाला तपासा अशा धमक्याच येतात. राजकीय दबावाखाली आम्हाला काम करावे लागत आहे, अशी तक्रारही त्यांनी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवा, मानधनामध्ये वाढ करा, कर्मचारी संख्याही वाढवा, अशी मागणी केली आहे.
यासंबंधी त्यांनी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला निवदेन दिले असून ते महापौर व महापालिका आयुक्त यांचीही यासंबंधी भेट घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा संप किती कालावधीसाठी असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या संपामुळे आधीच कमी कर्मचारी व त्यात संप यामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.
धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रभर डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्याचाच एक भाग वायसीएम रुग्णालयाच्या सर्व डॉक्टरांची आज सकाळी एक बैठक झाली. त्या बैठकीत डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून आज पिंपरीतील वायसीएम रुग्णालयातील 38 निवासी डॉक्टर व रुबी अल केअरचे दोन अशा 40 डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे.
यावेळी आपल्या मागण्या माडतांना उपस्थित डॉक्टरांनी आम्हाला मानधनही कमी मिळते, रुग्णालयात स्टाफ कमी आहे, तसेच रात्रीच्यावेळी किंवा एरवीही रुग्णाबरोबर 8 ते 10 नातेवाईक येतात. ते सुरक्षा रक्षकाला जुमानत नाहीत. डॉक्टरांना उद्धटपणे बोलणे, धक्काबुक्की करणे किंवा सरळ कानाला फोन लावून हाततले काम सोडून आधी रुग्णाला तपासा अशा धमक्याच येतात. राजकीय दबावाखाली आम्हाला काम करावे लागत आहे, अशी तक्रारही त्यांनी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवा, मानधनामध्ये वाढ करा, कर्मचारी संख्याही वाढवा, अशी मागणी केली आहे.
यासंबंधी त्यांनी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला निवदेन दिले असून ते महापौर व महापालिका आयुक्त यांचीही यासंबंधी भेट घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा संप किती कालावधीसाठी असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या संपामुळे आधीच कमी कर्मचारी व त्यात संप यामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.
