Breaking News

अजिंठा लेण्यांच्या पायथ्याला नियोजनाअभावी यात्रेत पर्यटकांचे हाल

औरंगाबाद, दि. 17 - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी रविवारी भरलेल्या यात्रेचा आणि लेण्या बघण्याचा हजारो पर्यटकांनी आनंद लुटला.  परंतु लेणीत जाण्या-येण्यासाठी एसटी महामंडळाचे नियोजन नसल्याने पर्यटकांचे प्रचंड हाल झाले. यातून लेणीच्या विकासासाठी कोट्यावधी खर्च करणारे शासन  पर्यटकांचा दहा मिनिंटांचा चा प्रवास अद्यापही सुखकर करू शकले नाही, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. मकरसंक्रांतिच्या दुसर्या दिवशी ‘कर निमित्त अजिंठा  लेणीच्या पायथ्याशी एकदिवसीय यात्रा भरली होती. .सोयगांव ,जामनेर ,सिल्लोड तालुक्यातील हजारो ग्रामीण पर्यटक लहान मुलांसह येथे सहकुटंब आले होते.  एसटी महामंडळाच्या नियोजना अभावी पर्यटकांचे हाल झाले.