शरद पवारांचा वारस काळच ठरवेल : सुप्रिया सुळे
पुणे, दि. 04 - यशवंतराव चव्हाण साहेबांनी शरद पवारांना मानसपुत्र मानले होते, मात्र त्यांचा वारसा कोण चालवेल हे काळच ठरवेल, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या आज पुण्यात बोलत होत्या. पवारांच्या संसदीय कार्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने राज्यस्तरीय शालेय निबंध आणि महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
शरद पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा अजित पवार सांभाळणार की सुप्रिया सुळे या प्रश्नावर आजवर पवार कुटुंबातील कुणीही कधीही जाहीर भाष्य केले नव्हते. मात्र आज सुप्रियाताईंनी शरद पवारांचा वारस काळ ठरवेल असे म्हटल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारच्या महिला सुरक्षा, कुपोषण, शेतकरी आत्महत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले.
शरद पवारांनंतर राष्ट्रवादीची धुरा अजित पवार सांभाळणार की सुप्रिया सुळे या प्रश्नावर आजवर पवार कुटुंबातील कुणीही कधीही जाहीर भाष्य केले नव्हते. मात्र आज सुप्रियाताईंनी शरद पवारांचा वारस काळ ठरवेल असे म्हटल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारच्या महिला सुरक्षा, कुपोषण, शेतकरी आत्महत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले.