Breaking News

रहाणेला संघातून वगळण्याची ही योग्य वेळ नाही - सौरव गांगुली

नवी दिल्ली, दि. 27 - अजिक्य रहाणेला संघातून वगळण्याची ही योग्य वेळ नाही. जर त्याला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले तर भारतीय संघासाठी ही मोठी चूक ठरू शकते, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांने व्यक्त केले.
रहाणे हा उत्तम फलंदाज आहे आणि सध्याची त्याची कामगिरी समाधानकारक असली तरी एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी थोडी निराशाजनक आहे. सध्या तो मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला आहे. यामुळे त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळवण्यावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. रहाणेला सध्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तो संयमाने खेळणारा फलंदाज आहे आणि त्यामुळे त्याला बाहेर ठेवणे संघाची मोठी चूक ठरेल, असे गांगुली म्हणाला.