Breaking News

औरंगाबादमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू

औरंगाबाद, दि. 29 - औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात 4 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू झाला.
कन्नड तालुक्यातील आदर्श वसाहतीतील 4 शाळकरी मुले सावरगावच्या शिवारात एका तलावात पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडले. या मुलांची नावे रामेश्‍वर पवार(15), उमेश पवार(14), आकाश पवार(15) आणि कृष्णा राजपूत(17) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तलावात बुडलेल्या या चारही मुलांचे मृतदेह सापडले आहेत.