Breaking News

देशसेवा, धर्मसेवा व गोसेवा यांना प्राचीन काळापासून महत्त्व

अहमदनगर, दि. 23 - देश सेवा, धर्म सेवा या सोबतच गो सेवेला प्राचिन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे. प्राचिन काळापासून गो शाळा अस्तित्वात आहेत. पूर्वी राम राज्यात शेती, व्यापार व गाय यांना महत्व दिले जायचे. ज्या देशातील गाय संकटात असते इसळक येथे निसर्गसृष्टी गोपालन संस्था संचलित श्री ब्रह्मचैतन्य गोदवलेकर महाराज गोशाळेच्या भुमिपूजनप्रसंगी मार्गदर्शन करताना हभप रामयणाचार्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर बोलत होते. याप्रसंगी  पंडित दीनदयाळ संस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा, पं.स.सभापती संदेश कार्ले, माजी सरपंच संजय गेरंगे, वाल्मिक कुलकर्णी, उद्योजक सुहास फुंदे, गो शाळेचे संस्थापक अध्यक्ष घन:श्याम देशपांडे, उद्योजक दिलीप अकोलकर, श्रीनिधी सोमाणी, भुषणराव भणगे, गिरीश मुळे, अपुर्वा गुजराथी, अनंतराव वैकर, एपीआय अविनाश बुधवंत, आर्ट ऑफ लिव्हींगचे युवा संघटनेचे जिल्हाप्रमुख अमर कळमकर, चंद्रकांत तागड आदि उपस्थित होते. भुमीपुजनासाठी श्रीनिधी सोमाणी व सौ.सोमाणी यांनी अभिषेक केला व पौराहित्य श्रीपाद जोशी गुरुजी यांनी केले.
 तो देश संकटात येतो. रामायन, महाभारत यामध्ये गोरक्षणाचे महत्व सांगितले आहे. ज्ञानेश्‍वर महाराजांनी सांगितले आहे की, जमिन पिकती राहण्यासाठी गाय जिवंत राहणे आवश्यक आहे. गाय परवडत नाही म्हणून गोधन संभाळले जात नाही. म्हणून सध्याची शेतीची परिस्थिती बिकट झाली आहे. शेतीची अवस्था नि:कृष्ट दर्जाची झाली आहे. हे शास्त्रीयदृष्ट्या पुढे आले आहे, असे प्रतिपादन विदर्भरत्न हभप संजय महाराज पाचपोर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कराळे यांनी केले तर आभार गजेंद्र सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्‍वास बेरड, निलेश गेरंगे, दिपक फुलडहाळे, विष्णू कुलकर्णी, गणेश कराळे, अनिल देवराव, संजय कदम, रोहन सांगोडे, दत्ताशेठ बनकर, ढगे ताई, नाथा देवतरसे, नरेंद्र सोनवणे, सुवेंद्र सोनवणे, संतोष गेरंगे, दामोदर गेरंगे आदींनी परिश्रम घेतले