Breaking News

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घौडदौड

मिरपूर, 30 - अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घौडदौड सुरुच आहे. मिरपूरमध्ये न्यूझिलंडविरुद्ध झालेल्या वनडेत भारताचा 120 रनने विजय झाला आहे. त्यामुळे भारत वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे.
259 रनचा पाठलाग करताना न्यूझिलंडची अवस्था 4 आऊट 16 झाली होती. या चारही विकेट भारताचा फास्ट बॉलर अवेश खानने घेतल्या. अवेशने दिलेल्या या धक्क्यानंतर मात्र न्यूझिलंडचा संघ सावरू शकला नाही, आणि 32 व्या ओव्हरमध्ये भारताने हा सामना जिंकला. या सामन्यात महिपाल लोमरोरची ऑल राऊंड कामगिरी पाहायला मिळाली. त्याने या मॅचमध्ये 5 विकेट तसेच 45 रनही केल्या.  टॉस जिंकून न्यूझिलंडने भारताला पहिले बॅटिंग दिली. पण सुरवातीलाच भारताची 19 रनवर 2 विकेट अशी दयनीय अवस्था झाली. पण त्यानंतर रिषभ पंत आणि सरफराज खान यांच्या 89 रनच्या पार्टनरशिपमुळे भारताचा डाव सावरला. पंतनं 83 बॉलमध्ये 57 तर सरफराजने 80 बॉलमध्ये 74 रन के
ल्या.