Breaking News

पाच जणांच्या हत्येच्या निशेधार्थ विविध संघटनांचे निवेदन


कोपरगाव / श. प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रानपाडा येथे भटक्या विमुक्त समाजातील पाच लोकांची निघूर्ण हत्या करण्यात आली. ही घटना निंदणीय असून, त्याचा तीव्र निषेध विविध संघटनांनी एकत्र येत नायब तहसीलदार यांना निवेदन देत केला.
निवेदनामध्ये, माणुसकीला काळिमा लावणारी ही घटना असून, सदरच्या व्यक्तीना जिवंत मारण्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झालेला आहे. त्याप्रमाणे त्यांचेवर गुन्हा दाखल केलेले आहेत. मात्र सदरची घटना दुर्दैवी असून, दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा व्हावी, व्हिडीओची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल व्हावे. भटक्या समाजातील लोक भिक्षुकी करतात, त्यांना उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरस्ती करतात. त्यांना या पुढे कोणताही त्रास होणार नाही व त्याना संरक्षण मिळावे अशा विविध मागण्या या निवेदनामध्ये केल्या आहेत. कोपरगावचे नायब तहसीलदार सुसरे यांना अखिल भटका जोशी समाज सेवा संघ युवा संघटन, भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना, भारतीय भटके गोसावी समाज महासंघ कोपरगाव यांचे वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर नवनाथ मोरे, राजेंद्र जोशी, सतीश काकडे, किरण सुपकेकर, रामदास वायकर, सोमनाथ गोर्डे, दादा पोटे, बाळासाहेब ढवले, रावसाहेब बाचकर, ललित गोडे, तुकाराम वायकर, ज्ञानेश्‍वर वायकर, अमोल घायतकर, सागर पोटे, कैलास साळवे, सागर पोटे, रोशन शेजवळ आदींच्या सह्या आहेत.