Breaking News

अग्रलेख - माणूसकीला काळीमा !


पुरोगामी म्हणून महाराष्ट्र राज्याचा नेहमीच उल्लेख आदराने केला जातो. मात्र याच पुरोगामी राज्यात जातीपातीच्या भिंती अजूनही मोठया दिमाखात उभ्या असल्याचे अनेक वेळेस निदर्शनास आले आहेत. जातीपातीच्या या भिंती उखडून फेकण्यासाठी अनेक महापुरूषांनी आपली हयात खर्ची घातली, मात्र तरीही मना मनातील जाती पातीच्या या भिंती गळून पडलेल्या नाहीत. नुकतेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी या गावातील दलित समाजातील दोन मुले इतर मुलासोबत एका उच्चवर्णीय समाजातील व्यक्तरीच्या विहीरीत पोहायला गेले. अर्थात त्या मुलांचे वय अंदाजे 12-14 या दरम्यान असेल. आमच्या विहीरात पोहायला गेला, आमची विहीर बाटवली म्हणून त्या मुलांची नग्न धिंड काढली जाते. त्यांना चाबकाने, पट्टयांने मारले जाते. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर देखील गुन्हा नोंद झाला नाही. की प्रशासनाला गुन्हा नोंद करून घ्यावा असे वाटले नाही. अखेर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली, त्यानंतर गुन्हा नोंद झाला. 21 व्या  शतकात आपण तांत्रिकतेच्या युगात वावरत असतांना देखील जातीपातीच्या भिंती अजूनही घट्ट अबसून, ग्रामीण भागात जातीयतेचे चटके आजही या समाजाल सहन क रावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. महाराष्ट्रातच जातीयतेच्या घटना घडत नाही, तर संपूर्ण देशात जातीयवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. मात्र सरकारकडून क ोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. दलितांवरील अत्याचाराच्या घटनांला पायबंद घालण्यासाठी अ‍ॅट्रासिटी कायद्या करण्यात आला आहे. मात्र या कायद्यातील नियम शिथील करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे अत्यंत दुदैवी आहे. ऊना येथील दलितांवरील अत्याचार, रोहित वेमुला प्रकरण तसेच घोड्यावर बसले म्हणून मारहाण, मिशा वाढवल्या म्हणून मारहाण असे अत्यंत घृणास्पद प्रकार या देशात आजही घडत आहे. हे अत्यंत अशोभनीय प्रकार आहे. माणसाने माणसोबत माणसारखं आजही जगायला आपण शिकलो नाही. वास्तविक या जातीयअत्याचारात वाढ होण्यास केंद्र आणि राज्यसरकारचे शिथील धोरण कारणीभूत असून, जातीपातीचे राजक ारण कारणीभूत आहे. विहीरीत पोहले म्हणून मातंग समाजाच्या मुलांना नग्न करून मारहाण करणे व त्याचा व्हिडीओ बनवणे ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. भाजपचे सरकार आल्यापासून देशात आणि राज्यात वारंवार अशा घटना घडत आहेत. भाजपशासित राज्यात अशा अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे. कडव्या हिंदुत्ववादी संघटना या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत, म्णजेच परिणामी भाजपासोबत असल्यामुळे आमचे कुणीही वाकडे करू शकत नाही, असा गैरसमज या उद्दाम जातीयवादी लोकांत पसरला आहे. तसेच भाजपाचे सरकार देखील या जातीयवाद्यांना फटकारतांना दिसत नाही. त्यामुळे अशा घटनांवर शंका वाढायला लागल्या आहेत. काय गुन्हा केला हो? त्या मुलांनी. फक्त पोहायला गेले, म्हणून इतकी मारहाण? नग्न करून धिंड काढण्याइतकी, त्यांची मजल जाते, याला नेमके काय म्हणावे. त्यामुळे अशा घटनांचा निषेध व्यक्त करून जमणार नाही. तर अशा गुन्हेगांराना कायद्यांचा बडगा उगारल्याशिवाय त्यांचातील जातीचा अंहकार उतरणार नाही.