Breaking News

काेहलीने पाचव्यांदा केल्या ५०० पेक्षा अधिक धावा


बंगळुरूचा कर्णधार विराट काेहलीने गत सामन्यातील विजयाने अापल्या टीमच्या प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा पल्लवित केल्या अाहेत. यादरम्यान त्याने नाबाद ४८ धावांची खेळी केली. यासह त्याने अायपीएलमध्ये विक्रमाचा पल्ला गाठला. त्याने अायपीएलमधील अापला झंझावात कायम ठेवताना विक्रमाची नाेंद केली.
काेहलीने साेमवारी पंजाबविरुद्ध सामन्यात नाबाद ४८ धावा काढल्या. त्याने २८ चेंडूंचा सामना करताना चार चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे ही खेळी केली. यासह त्याने यंदाच्या सत्रात ५०० धावांचा पल्ला गाठला.