Breaking News

उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू

सोलापूर : उन्हाचा पारा 42वर पोहचल्याने शेतामध्ये काम करणार्‍या विठ्ठल कृष्णा लोखंडे ( वय 58, रा. माळशिरस ) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. सध्या वाढणारी उष्णता जिवघेणी आहे. त्यात भर उन्हात शेतात काम करणं म्हणजे आपल्या जीवाशी खेळ करण्यासारखं आहे. यात तडाख्याच्या उन्हाने शेतमजूराचा मृत्यू झाला आहे.

कृष्णा लोखंडे हे एका शेतकर्‍याच्या शेतात मका काढण्याचं काम करीत होते. मका तोडत असताना उन्हाचा तीव्र झटका बसल्याने औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातंवडे असा परिवार आहे.