Breaking News

ओबीसी जनगणनेचे आंदोलनच ओबीसी नेत्यांना जेलमधून बाहेर काढेल!


बहुजनांनो.... ! 
धार्मिक अफूच्या नशेत ब्राह्मणवाड्यात जाऊन झाडं लावून झाल्यावर व त्याचा वटवृक्ष झाल्यावर ओबीसी नेत्यांना एकतर यमसदनात किंवा जेलमध्ये किंवा काळ्या पाण्यावर कसे पाठविले जाते, हे आपण मागील खेपेत पाहिले. धुळ्याला आमचे एक ओबीसी कार्यकर्ते जातीच्या सभेत फार तावात बोलत होते. ते म्हणाले की काल मी शिवसेनेच्या मिटिंगमध्ये जाऊन सगळ्यांना दम देऊन आलो आहे. शिवसेनेचे इतकी वर्षे काम करूनही मला यावेळी तिकीट दिले नाही तर मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.’ टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘मग ते शिवसेनेवाले खूप घाबरले असतील ना?’ एका भोळ्या कार्यकर्त्याचा भाबडा प्रश्‍न. दुसरा एक हुशार म्हणाला- ‘ते कसले घाबरणार? ते म्हणत असतील, ‘इतके दिवस शिवसेनेत राहून बाळासाहेबांची सेवा केली, आता काही दिवस राष्ट्रवादीत जाऊन पवारसाहेबांची सेवा करा. तुमच्या सेवेने पवारसाहेब तृत्प पावले की, चव्हाणसाहेबांची सेवा करण्यासाठी काँग्रेसमध्येही चक्कर मारून या!’
....................................................................................................................................................
मनुवादी व्यवस्थेने आपल्या सर्व राजकीय पक्षांना राजकीय धोरण ठरवून दिले आहे. बसपा पासुन शिवसेनेपर्यंत व काँग्रेसपासून राष्ट्रवादीपर्यंतचे सर्व राजकीय पक्षांचे धोरण आर.एस.एस.ने ठरवून दिलेले आहे. कोणत्याही पक्षात ओबीसी नेता डोईजड होणार नाही याची काळजी घ्या. काँग्रेसमध्ये कोणी नेता डोईजड होत असेल तर त्याला भाजपात पाठवा, भाजपमध्ये कोणी ओबीसी नेता डोईजड होत असेल तर, त्याला शिवसेनेत पाठवा. शिवसेनेत डोईजड झाला तर काँग्रेसमध्ये पाठवा. या सर्व पाठवा-पाठवीतूनही एखादा ओबीसी नेता देशपातळीवर जात असेल तर त्याला सरळ तुरूंगात टाका किंवा यमसदनाला पाठवा.
मनुवाद्यांच्या सार्यात षडयंत्रांना पुरून उरणारे तीनच ओबीसी नेते आहेत, एक सद्यकालीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व दुसरे तुरूंगवासी छगन भुजबळ व स्मृतिशेष मुंडेसाहेब! 2014 पर्यंत ओबीसी जागृतीची लाट पाहता मोदींना नाईलाजास्तव प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार बनवावे लागले. अर्थात खाऊजा धोरणाच्या अनुषंगाने मोदींनी बनिया-जात-वर्गाशी केलेली दोस्तीही त्यावेळी उपयोगी पडली. ओबीसी मते घेऊन प्रधानमंत्री व्हायचे व बनिया जातवर्गाची आश्‍वासने पुर्ण करायची, असेच एकूण धोरण होते. ओबीसींच्या मतावर निवडून आल्यावरही ओबीसींसाठी काही करायचेच नव्हते, कारण ओबीसींनी मोदींवर एकतर्फी प्रेम केले. हे प्रेम दुतर्फा होऊ नये, यासाठी संघपरीवार सुरूवातीपासूनच काळजी घेत आहे. प्रधानमंत्री मोदिंच्या अवती-भवती एकही हुशार ओबीसी फिरकणार नाही, याचीही दक्षता घेतली जाते. झचज, -र्वींळीशी लेााळीींंशश, सचिवालय व समकक्ष सर्व कार्यालये कट्टर ब्राह्मणी अधिकार्यां नी ओतप्रोत भरेली आहेत. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष (माननीय ईश्‍वरैयासाहेब) मोदींना एकदाच भेटले आणी मोदींनी चर्चेअंती ओबीसी आयोगाचा कायदा करण्याचे मनावर घेतले. मोक्याच्या जागेवर बसलेली व्यक्ती लोकानुनयापायी किंवा हुशार बुद्धीजीवीच्या संसर्गाने क्रांतीकारक निर्णय घेऊ शकते व प्रस्थापित सत्ताधारी मनुवादी छावणीला सुरूंग लावू शकते, हा ऐतिहासिक अनुभव अनेकदा घेतलेले व त्यातून शिकलेले ब्राह्मण आज सर्वच ओबीसी नेत्यांना कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत.
आमचे धुळ्यातले झुंजार व तडफदार ओबीसी नेते दिलिप देवरे यांच्यावर आम्ही धुळे येथील ओबीसी जनगननेची जबाबदारी टाकली. ओबीसी जनगणना परिषदेला माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांनी मार्गदर्शन करण्यासाठी यावे, यासाठी स्वतः दिलीप देवरे पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांसोबत तिनदा भेटले. पत्रेही दिलीत. शेवटच्या प्रयत्नाच्यावेळी दिलीप देवरेंना मंत्रालयातील एक जबाबदार आफिसर भेटले व त्यांनी दिलीप देवरेंना वस्तुस्थीती सांगीतली. मंत्रालयातील वस्तुस्थिती काय आहे? मंत्र्यांना आलेली निमंत्रणे त्या त्या विभागातील ब्राह्मण सचिवाकडे जातात व कोणत्या कार्यक्रमाला मंत्र्यांनी जावे वा जावू नये, याचा निर्णय हे ब्राह्मण अधिकारी घेतात. ज्या मुंडेसाहेबांनी स्वयंप्रज्ञेने आपले ओबीसी नेतृत्व सिद्ध केले व त्यासाठी आपल्या प्राणाची आहुतीही दिली, त्या मुंडेसाहेबांचे स्वप्न त्यांच्याच कन्येकडून चक्काचूर करून घेतले जात आहे. एकट्या पंकजाताईंनाच काय दोष द्यायचा? कांशीरामसाहेंबांचा चेला म्हणून मिरविणारे जानकरही आज ब्राह्मणांच्या नजरकैदेत बंदिस्त आहेत. बाकीच्या ओबीसी आमदार-खासदारांबद्दल काही सांगण्याची गरजच नाही! 
2011 च्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून आवाज उठविणारे ओबीसी खासदार व आमदार आज ‘शांत’ केले गेले आहेत. आता 2021 च्या जनगणेत ओबीसींची जनगणना होण्यासाठी आवाज करणारा एकही ओबीसी नेता शिल्लक ठेवला गेलेला नाही. काही जेलवासी, काही स्वर्गवासी तर काही एकांतवासी! काही ब्राह्मण अधिकार्यांसच्या नजरकैदेत आणी बाकीच्यांच्या पाठीशी इडी-सिडी लावलेली आहेच! अशावेळी ओबीसी जनतेने शहाणपणा दाखवावा व ओबीसी जनगणनेचे आंदोलन स्वयंभूपणाने उभे करावे. नेत्यांच्या आदेशाची वाट पाहू नये. ज्या मनुवादी व्यवस्थेने आपल्या ओबीसी नेत्यांना जेलवासी-स्वर्गवासी केलेले आहे, ती मनुवादी व्यवस्था नष्ट करण्याचे काम ओबीसी जनगणनाच करणार आहे. ओबीसी जनगणना म्हणजे जातीव्यवस्थेवर कुठारघातच! ओबीसी जनगणनेमुळे जातीव्यवस्थेचे आर्थिक कंबरडे मोडले जाणार आहे. ओबीसी जनता ज्या प्रमाणात जनगणना आंदोलन उभे करेल तेवढ्या लवकर जेलवासी ओबीसी नेते जेलमधून बाहेर येतील.
जयजोती! जयभीम!!

------- प्रा. श्रावण देवरे
Mobile - 88 301 27 270 
Email- s.deore2012@gmail.com