19 वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी पराभव केलाय. पहिल्यांदा बॅटिंग करतांना भारतानं 50 ओव्हरमध्ये 328 रन्स केले. पृथ्वी आणि मनजोतनं 180 धावांची सलामी दिली. पृथ्वीचं शतक अवघ्या 6 धावांनी हुकलं तर मनजोत कलरानं 86 धावांची खेळी केली.तर शुभम गिलनं 63 धावा केल्या. 329 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाला पेललं नाही. 228 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम गारद झाली. भारताकडून नगरकोटीनं 29 धावांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. तर शिवम मावीनं 45 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड वगळता कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. एडवर्डनी 71 धावांची खेळी केली.