Breaking News

शेतकऱ्याच्या 18 वर्षीय मुलाची आत्महत्या.

नापिकीमुळे शेतीतील पीक वाया गेले. तसंच वडिलांवर असणारं कर्ज, यामुळे आता घराचा खर्च वडील कसा चालवणार? या विवंचनेत शेतकऱ्याच्या मुलानं हे टोकाचं पाऊल उचललं. परभणी तालुक्यातील बोरवंड गावात एका शेतकऱ्याच्या 18 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


बोरवंड गावात राहणाऱ्या लखन गिराम असं या तरुणाचं नाव असून तो केवळ 18 वर्षाचा होता.वडिलांनी शेतात लावलेले पीक वाया गेले यामुळे या निराश झालेल्या लखननं आत्महत्या केली असल्याचं त्याच्या चुलत भावाने पोलीस फिर्यादीत म्हटलं आहे.लखनच्या घरात वडील, आई आणि मोठा भाऊ असा परिवार असून एक विवाहित बहीण आहे. 

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून शेतकऱ्यांपाठोपाठ तरुण मुलंही आत्महत्येचं पाऊल उचलू लागल्यानं आता ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार झालं आहे.