Breaking News

हजारो मंडळांच्या परवानग्या रखडल्या

मुंबई, दि, 25, ऑगस्ट - गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबईत अद्यापही तब्बल 900 गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून परवानग्या देण्यात  आलेल्या नाहीत. केवळ 700-800 मंडळांना सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. गणेशोत्सव मंडळांना परवानग्या देण्यासाठी सुरु करण्यात आलेली वन विंडो  सिस्टीम फोल ठरली आहे. पोलिस प्रशासनाकडून दिल्या जाणा-या एनओसी रखडल्यानं गणेशोत्सव मंडळांना परवानग्या मिळाल्या नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.  तर, सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात म्हणून सुरु करण्यात आलेली एक खिडकी योजना, पूर्णता अयशस्वी झाल्याचं गणेशोत्सव समन्वय समितीनं म्हटलं  आहे.