Breaking News

राजमौलींच्या नव्या सिनेमाचा विषय ठरला, बिग बी, आमीर एकत्र

मुंबई, दि. 15 -  बहुप्रतीक्षित बाहुबली चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ येत्या 28 एप्रिलला प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मात्र दिग्दर्शक राजमौली यांच्या डोक्यात पुढील सिनेमाची गणितं शिजायला सुरुवात झाली आहे. राजमौलींचा आगामी चित्रपट महाभारतावर आधारित असून बिग बी, आमिर खान यांची निवड झाल्याची माहिती आहे.
अमिताभ बच्चन, आमिर खान, मोहनलाल या आघाडीच्या अभिनेत्यांना एकत्र आणून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे. 2018 मध्ये याच्या निर्मितीला सुरुवात होईल. 400 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाचं नाव अद्याप निश्‍चित करण्यात आलेलं नाही. तमिळ, तेलुगू, हिंदी या तीन भाषेत चित्रपटाची निर्मिती होईल. ‘सध्या माझं पूर्ण लक्ष बाहुबलीच्या दुसर्‍या भागावर. दुसरे कोणतेही विचार माझ्या डोक्यात नाहीत. बाहुबलीनंतर लगेचच महाभारतावर चित्रपट आणण्याची शक्यता कमी आहे. हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याने त्याचे कलाकार, तंत्रज्ञ यांची जुळवाजुळव करायला वेळ लागेल.’ असं राजमौली म्हणाले. आमिर खानची भेट घेतल्याचं राजमौली यांनी स्पष्ट केलं. या विषयावर आमिर सकारात्मक आहे, असंही ते म्हणाले.