धर्मशाला कसोटीतील विजयाचा शिल्पकार रवींद्र जाडेजा
मुंबई, दि. 30 - एका जमान्यात केवळ ट्वेन्टी ट्वेन्टीत खेळू शकणारा क्रिकेटर म्हणून अनेकांनी रवींद्र जाडेजाला हिणवलं होतं. पण त्याच जाडेजानं अष्टपैलू खेळाडू म्हणून गेल्या काही महिन्यांत आपल्या कारकीर्दीला कलाटणी दिली आहे आणि भारताच्या विजयात वेळोवेळी मोलाची भूमिका बजावली आहे. रवींद्र जाडेजानं आपल्या टीकाकारांना अगदी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जाडेजाच्याच अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
जाडेजानं त्या कसोटीच्या पहिल्या डावात 63 धावांची खेळी करुन भारताला ऑस्ट्रेलियावर 32 धावांची आघाडी मिळवून दिली. मग दुसर्या डावात तीन विकेट्स काढून त्यानं भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. इतकंच नाही, तर जाडेजा मालिकेत सर्वाधिक 25 विकेट्ससह मालिकावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला. एक डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून जाडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये आपला दरारा निर्माण केला आहे. आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
जाडेजानं ऑगस्ट 2016 नंतर 14 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 74 विकेट्स काढल्या आहेत. रवींद्र जाडेजाची खासियत म्हणजे केवळ गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही त्यानं वेळोवेळी निर्णायक भूमिका बजावली आहे. जाडेजानं या मोसमात 578 धावा केल्या आहेत. जाडेजानं जेव्हा जेव्हा अर्धशतकाची वेस ओलांडली, तेव्हातेव्हा भारताला विजयाची संधी मिळवून दिली. जाडेजानं गेल्या आठ कसोटींत 6 अर्धशतकं ठोकली असून त्यापैकी 5 कसोटी भारतानं जिंकल्या तर एक कसोटी अनिर्णित राहिली.
जाडेजानं त्या कसोटीच्या पहिल्या डावात 63 धावांची खेळी करुन भारताला ऑस्ट्रेलियावर 32 धावांची आघाडी मिळवून दिली. मग दुसर्या डावात तीन विकेट्स काढून त्यानं भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. इतकंच नाही, तर जाडेजा मालिकेत सर्वाधिक 25 विकेट्ससह मालिकावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला. एक डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून जाडेजानं कसोटी क्रिकेटमध्ये आपला दरारा निर्माण केला आहे. आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
जाडेजानं ऑगस्ट 2016 नंतर 14 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 74 विकेट्स काढल्या आहेत. रवींद्र जाडेजाची खासियत म्हणजे केवळ गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही त्यानं वेळोवेळी निर्णायक भूमिका बजावली आहे. जाडेजानं या मोसमात 578 धावा केल्या आहेत. जाडेजानं जेव्हा जेव्हा अर्धशतकाची वेस ओलांडली, तेव्हातेव्हा भारताला विजयाची संधी मिळवून दिली. जाडेजानं गेल्या आठ कसोटींत 6 अर्धशतकं ठोकली असून त्यापैकी 5 कसोटी भारतानं जिंकल्या तर एक कसोटी अनिर्णित राहिली.