Breaking News

भारतात ‘मन की बात’ अत्यंत कठीण - करण जोहर


जयपूर, 22 - भारतात ‘मन की बात’ होण अत्यंत कठीण असल्याचे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक करण जोहर वक्तव्य केले आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये लेखिका शोभा डे यांनी घेतलेल्या मुलाखतीत करण जोहरने हे वक्तव्य केले आहे.
भारतात आपल्या मनासारखी गोष्ट करणे अत्यंत कठीण आहे. कोणतही गोष्ट करायच्या आधी माझ्या मनात सारखी भीती असते की कोणी माझ्याविरोधात एफआयआर तर दाखल नाही ना करणार?, असे करण म्हणाला. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विनोद आहे, तर लोकशाही त्याहूनही मोठी थट्टा असल्याचेही करण जोहर म्हणाला. याआधीही आमिर खानने देशात वाढत्या असहिष्णुतेविरोधात वक्तव्य केले होते. त्यावरुन आमीरवर जोरदार टीकाही झाली.