Breaking News

दहावीतील गुणवंतांचा सन्मान


राहुरी ता. प्रतिनिधी

येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्यावतीने दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

चैतन्य मिल्कच्या सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष बाळासाहेब भांड होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड, संदीप भांड, माजी उपनगराध्यक्ष गोवर्धन शेटे, शिवाजी भांड, भारत साळवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे, संजय घोलप, रवी भांड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हसन सय्यद, सौरभ घोलप, ऋषि राउत, नीलेश कुंभार प्रयत्नशील होते. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले.