Breaking News

प्रजासत्ताक दिनी ‘संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन’


मुंबई : खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ‘संविधान बचाव सत्याग्रह आंदोलन’ पुकारण्यात आले आहे. हा लाँग मार्च मुंबईत मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापासून गेट वेवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. मंत्रालय ते गेट वे मार्च पूर्ण झाल्यानंतर 2 तास मौन बाळगून संविधान बचाव सत्याग्रह करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय संविधान बचाव सत्याग्रहाच्या मोर्च्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,जेदयूचे माजी नेते शरद यादव, खासदार राजू शेट्टी, महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी, पाटीदार नेता हार्दीक पटेल, गुजरातचे आमदार अल्पेश ठाकूर, दलित नेते आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील सहभागी होणार आहेत. लक्षणीय म्हणजे या सत्याग्रहामध्ये काँग्रसचे नेते सहभागी होणार की नाही याबाबत अजूनही चर्चा नाही. सर्वपक्षीय संविधान बचाव सत्याग्रह हे खासदार राजू शेट्टी यांच्या कल्पनेतून निघणार आहे.