शरद पवार यांचे भक्कम विचार घेऊन महाराष्ट्र घडवूया - सुनिल तटकरे
कर्जत, दि. 07, नोव्हेंबर - जनमनाचा आदर असलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे आपण एक भक्कम विचार घेऊन महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राष्ट ्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पदाधिकार्यांना केले.
आजपासून कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर सुरु झाले. हे शिबीर उद्यापर्यंत चालणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे मार्गदर्शन करत होते.
शरद पवार यांच्या राजकारणातील 50 वर्षांच्या अनुभवाचे आणि कार्याची आदरयुक्त भीती इतर पक्षांना आहे. त्यामुळेच 17 वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातील आणि देशातील जनतेला आणि राजकारणाला अपेक्षा आहेत असे त्यांनी सांगितले. जेव्हा निवडणुका येतील त्यावेळी ठामपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज होण्याची भूमिकाही तटकरे यांनी पक्षाच्या पदा धिकार्यांसमोर मांडली.
पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाने अनेक आव्हाने पेलली आहेत. पक्षाचे नेते जनतेची बाजू आक्रमकपणे आणि तितक्याच भक्कमपणे मांडत आहेत. त्यामुळेच राज्यातील शेतक र्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ही भावना जनतेत निर्माण झाली आहे. ही भावना टिकवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. राज्यात विकासाचे ढोंग घेतलेल्या सरक ारपर्यंत शेतकर्यांच्या समस्या कशा पोचतील, असा प्रयत्न आक्रमकपणे शरद पवार यांनी आणि पक्षाने केला आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.
आजपासून कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर सुरु झाले. हे शिबीर उद्यापर्यंत चालणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे मार्गदर्शन करत होते.
शरद पवार यांच्या राजकारणातील 50 वर्षांच्या अनुभवाचे आणि कार्याची आदरयुक्त भीती इतर पक्षांना आहे. त्यामुळेच 17 वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यातील आणि देशातील जनतेला आणि राजकारणाला अपेक्षा आहेत असे त्यांनी सांगितले. जेव्हा निवडणुका येतील त्यावेळी ठामपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज होण्याची भूमिकाही तटकरे यांनी पक्षाच्या पदा धिकार्यांसमोर मांडली.
पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाने अनेक आव्हाने पेलली आहेत. पक्षाचे नेते जनतेची बाजू आक्रमकपणे आणि तितक्याच भक्कमपणे मांडत आहेत. त्यामुळेच राज्यातील शेतक र्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ही भावना जनतेत निर्माण झाली आहे. ही भावना टिकवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. राज्यात विकासाचे ढोंग घेतलेल्या सरक ारपर्यंत शेतकर्यांच्या समस्या कशा पोचतील, असा प्रयत्न आक्रमकपणे शरद पवार यांनी आणि पक्षाने केला आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.