Breaking News

हवामान आधारीत पुनर्रचित पीक वीमा योजना लागू

पुणे, दि. 05, ऑक्टोबर - प्रधान मंत्री पीक वीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत पीक वीमा योजना 2017-18 लागू करण्यात आली आहे. ही योजना  फळपिकांनाही लागू असून, शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे कमी अधिक पाऊस, वेगाचा वारा,  गारपीट व आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकर्‍यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश  असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील पेरू, द्राक्षे, डाळींब, केळी, आंबा, लिंबू, मोसंबी, संत्री या अधिसूचित फळपिकांसाठी सदर योजना इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत  कार्यान्वित करण्यात येत आहे. फळपिकनिहाय अधिसुचित महसूल मंडळामध्ये हि योजना राबविण्यात येणार असून, या योजनेसाठी पुणे जिल्ह्याकरीता फळपिकनिहाय  अधिसूचित तालुके पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये आंबा या पिकासाठी दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरुर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापुर या  तालुक्यांचा समावेश आहे. तर डाळींब - दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, सासवड, शिरुर, हवेली या तालुके आहेत. द्राक्षे - दौंड, आंबेगाव, बारामती,  जुन्नर, इंदापुर. केळी - दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, खेड, हवेली, शिरुर. मोसंबी - इंदापुर. संत्रा - शिरुर. पेरु - बारामती, दौंड, हवेली, भारे,  पुरंदर, शिरुर. लिंबु - शिरुर, बारामती, दौंड या तालुक्यांचा समावेश आहे.
ही योजना कर्जदार शेतकर्‍यांना अनिवार्य असून, बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. या योजनेत हवामानातील बदलामुळे म्हणजेच अवेळी पाऊस, जास्त  तापमान, कमी तापमान, यामुळे फुलधारणा व फळ धारणेच्या कालावधीत होणार्‍या संभाव्य नुकसानीस विमा संरक्षण देय राहील. योजनेमध्ये शेतकर्‍यांनी विमासंरक्षीत  रकमेच्या केवळ 5 टक्के विमा हप्ता भरावयाचे आहे. या योजनेत नुकसान भरपाई महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार देण्यात येणार  आहे, त्यामुळे मानवी हस्तक्षेप राहणार नाही. अधिसुचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारीे यांनी केले आहे. तर या योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही यावेळी सांगण्यात आहे.
कर्जदार/बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी फळपिकांचा विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत व प्रति हेक्टर विमा हप्ता पुढील प्रमाणे आहे.
पीक विमा हप्ता रुपये प्रति हेक्टर अंतिम मुदत पेरु 2500, 31 ऑक्टोबर द्राक्षे 14000, 15 ऑक्टोबर डाळींब 5500, 31 ऑक्टोबर केळी 6000, 31 ऑक्टोबर  आंबा 5500, 31 डिसेंबर लिंबु 3000, 14 नोव्हेंबर मोसंबी 3500, 31 ऑक्टोबर संत्रा 3500