Breaking News

’दंगल’साठी भावाला सल्ला नाही : आयुष्मान

मुंबई :  अभिनेता आयुष्मान खुरानाने सांगितले की, आपला भाऊ अपारशक्तिला त्याचा पहिला चित्रपट ’दंगल’साठी कोणताही सल्ला दिला नाही. चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. आयुष्मान वान ह्यूसेन आणि जीक्यू फैशन नाइट्सवेळी रँपवर वॉक करीत
होता. कार्यक्रमानंतर तो म्हणाला,मी त्याला कोणताही सल्ला दिला नाही. तो माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे. म्हणून त्याला ’दंगल’ चित्रपट मिळाला. आजवर मी एवढा मोठा चित्रपट केला नाही, तो करीत आहे.’
आयुष्मानला ’पानी दा रंग’, ’सड्डी गली’ आणि ’मिट्टी दी खुशबू’ या पंजाबी गीतांसाठी ओळखले जाते. आपल्या दंगलसाठी निवडण्याचे कारण हरियाणवी बोली असल्याचे तो म्हणाला. आयुष्मानने सांगितले, माझी पंजाबी चांगली आहे आणि त्याची हरियाणवी. कारण तो अंडर-19 हरियाणा क्रिकेट टीमचा कप्तान होता. तो स्कूलमध्येही कप्तान होता, त्यामुळे तो शारीरिकदृष्ट्या मजबूत आहे. म्हणून तो ’दंगल’मध्ये आहे.’