Breaking News

वनपाल राजेंद्र कांबळे यांचे निधन


अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील रहिवासी तथा वनपाल राजेंद्र श्रीपत कांबळे यांचे शनिवारी (दि.09) सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 52 वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी सकाळी ड्यूटीवर जाण्यास निघाले असता, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. वनखात्यामध्ये नाशिक, अकोले येथे त्यांनी सेवा केली. नोकरीच्या सुरुवातीला सातपुडा डोंगराच्या हद्दीत त्यांनी सेवा केली. वनखात्यामध्ये काम करत असताना अनेक औषधी वनस्पतींचीही त्यांना ओळख झाली होती. बरेच जण त्यांच्याकडे झाडपाल्याच्या औषधासाठी येत. राजेंद्र कांबळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. कांबळे यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वार्ताहर दीपक कांबळे व प्रवीण कांबळे यांचे ते वडील होत.