Breaking News

सातत्याने सत्कार्याच्या भावनेतून काम : कोल्हे


कोपरगाव शहर प्रतिनिधी : 

मुस्लीम बांधवांसाठी रमजान ईद अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण आहे. सर्वधर्मसमभावाच्या वागणुकीतून त्यांना आम्ही कधीही अंतर दिलेले नाही. संकटात संजीवनी उद्योग समुहाने व कोल्हे परिवाराने सातत्याने सत्कार्याच्या भावनेतून काम केले, असे प्रतिपादन अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

येथील कृष्णाई मंगल कार्यालयात रविवारी { दि. १०} कोपरगांव मतदारसंघातील मुस्लिम बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफतार पार्टीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे होते. याप्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, दत्तात्रय कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, पराग संधान सर्व नगरसेवक संजीवनी कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, कैलास जाधव, योगेश बागुल, मौलाना असिफ, मौलाना हाफीज, हाजी सद्दाम सय्यद, अल्ताफ कुरेशी, अरीफ कुरेशी, फकिर महंमद पहिलवान, फिरोज पठाण, अन्वर शेख, वैभव गिरमे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मौलाना मुनीर उर्दु हायस्कुलचे प्राचार्य रियाज शेख यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीय सहाय्यक आयूब पठाण, संजीवनीचे सुरक्षा अधिकारी अकबर शेख, अल्ताफ कुरेशी, जयवंत मरसाळे, पंडीत पंडोरे आदींनी पुढाकार घेतला.