Breaking News

राज्यात मे आणि जून महिन्यात उन्हाचा कडाका अधिक तीव्र होणार

राज्यात मे आणि जून महिन्यात उन्हाचा कडाका अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही शहरांत उष्णतेची लाट येणार आहे, तर या विभागांतील काही शहरांचे कमाल तापमान ५० अंशाच्या जवळपास जाणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.१५ मार्च ते २५ एप्रिलच्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा ताप चांगलाच वाढला आहे. या पुढील कालावधीत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा येणार आहेत, तर मे आणि जून महिन्यातही उन्हाची तीव्रता अधिक वाढणार आहे.राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासहा गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणातील काही भाग त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, ओरिसा आदी राज्यांत काही ठिकाणी कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे