Breaking News

मुंबईतील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट


मुंबई: मुंबईतील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने केलेल्या (एनसीआरबी) अहवालात स्पष्ट करण्यात आले. तर बंगळुरू हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक असुरक्षित शहर असल्याचेही सांगण्यात आले आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम (आयपीसी) अंतर्गत नोंदणीकृत गुन्हेगारीसाठी गुन्हेगारीत 19 शहरांच्या यादीमध्ये मुंबई तिसर्‍या क्रमांकावर आहे. गुन्हे नोंद विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, मुंबईतील गुन्ह्यांची संख्या ही दिल्ली आणि बंगळुरूच्या तुलनेत एक लाख लोकसंख्येच्या सरासरीच्या तुलनेत कमी असल्याचे समोर आहे.