Breaking News

दहीहंडीवरील निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाकडून मागे, 14 वर्षांखालील गोविंदांवर बंदी

मुंबई, दि. 07 - दहीहंडी खेळावरील असलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालायाने आज दिला. दहाहंडीमध्ये सहभागी होणा-या गोविंदांची वयोमर्यादा  18 वरून 14 करण्यात आली आहे. मात्र, थरांच्या उंची बाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 
या निर्णयासाठी न्यायालयाने यापूर्वीच्या खटल्यांचा विचार न करता स्वतंत्र सुनावणी घेतली. राज्याच्या गृह खात्याने याबाबतचा प्रस्ताव न्यायालयात मांडला होता.  त्या प्रस्तावाला आधार मानून न्यायालयाने हा निर्णय दिला. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती. दहीहंडीचे थर हा  संस्कृतीचा भाग असल्याचा युक्तीवाद राज्य सरकारच्यवतीने न्यायालयात करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी  न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी राज्य सरकारचेही आभार मानले आहे.